⦿ समर्थ रामदास स्वामी लिखित दासबोध ग्रंथाच्या अध्ययनास प्रोत्साहन देणे.
⦿ दासबोध आणि समर्थ वाङ्मय (साहित्य) वर पारायण आणि संशोधन अध्ययन आयोजित करणे.
⦿ सार्वजनिक नैतिक मुल्ये वाढवून समाजातील सर्व स्तरांत राष्ट्रीयतेची भावना उंचावणे.
⦿ दासबोध ग्रंथातील तत्वांच्या आधारे नैतिक मुल्ये प्रसारित करून समाजाला स्थिर व चांगली उपजीविका देण्यासाठी शासकीय प्राधिकरणांना प्रोत्साहित करणे, मदत करणे.
⦿ दासबोध अभ्यास संबंधी शिबिरे घेणे , परिषदांमध्ये सहभागी होणे
⦿ विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम वृद्धिगत व्हावे म्हणून विविध शाळांमध्ये समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयावर आधारित संस्कारवर्ग घेणे.
⦿ शासकीय नोंदणीकृत रक्त संकलन केंद्रांसोबत समन्वय साधून रक्तदान शिबिरे आयोजित करणे.
⦿ निसर्ग संरक्षण आणि निरोगी पर्यावरण यासाठी वृक्षारोपण प्रकल्पांमध्ये सहभाग घेणे.